दोन तालुक्याच्या टोकावर सापडले ते गाव ऑनलाइन मध्ये नावच नसल्यामुळे शासनाच्या शासकीय योजनेपासून वंचित

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - शेगाव येथून काही अंतरावर असतेल्या वरोरा ते चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या निमढेला गाव असून दोन तालुक्याच्या टोकावर बसले आहे या गावचे ऑनलाईन मध्ये नावच नसल्यामुळे आजही दोन तालुक्यांमध्ये सापडल्यामुळे दहा वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेले गाव आहे.या गावाला महसुल विभाग हा चिमुर तालुक्यातील येत असून ग्रामविकास विभाग हा वरोरा तालुक्यातील आहे, या गावची ग्रामपंचायत खानगाव आहे जी चिमुर तालुक्यातील येत आहे 2014 पासून हे गाव ऑनलाईन नसल्यामुळे त्या गावला आजही समाज कल्याण योजना, कृषी विभाग योजना, घरकुल योजना पासून वंचित राहावे लागत आहे. या गावाचे पुनर्वसन तलावालगत असणाऱ्या जागेवर सन १९७६ ते ७७ मध्ये तात्पुरते करण्यात आले होते, हे गाव रामदेगी लगत असणाऱ्या तलाव मध्ये होते
गावाकऱ्यांनी सांगितले कि मागील ४० वर्षा पासून त्यांच्या मागण्या प्रलंबित असून त्यांना चंदई नाला च्या प्रकल्पावेळी स्थलांतरीत करून त्यांच्या जमिनीच्या बदल्यात जमिनी देण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते ते अध्यापही पूर्ण झाले नाही तसेच या बद्दल यांनी कित्तेकदा आंदोनल करत गावाची पुनर्वसनाची मागणी केली अनेक वेळा मुंबई या ठिकाणी जाणे यांनी सुद्धा केले याचा काहीही फायदा झालेला नाही निमढेला हे गाव चिमूर तालुक्यातील खानगाव या गट ग्रामपंचायतला तात्पुरते जोडण्यात आलेले असून त्याची ऑनलाईन मध्ये नोंद नसल्यामुळे प्रशासन यांच्या निष्कर्जीमुळे जनतेला अनेक वर्षापासून हा त्रास सहन करावा लागत आहे,  देशात सगळीकडे ऑनलाईन कारभार सुरु असताना मात्र या गावाचा रेकॉर्ड ना चिमूर पंचायत समितीला आहे ना वरोरा पंचायत समितला आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला,लोकांचे ऑनलाईन दाखले, ईतर असलेले सगळेच कामे खोळंबले आहे. एवढेच नव्हे तर या गावात खानगाव ग्रामपंचायत मार्फत १५/१७ आदीवासी शबरी घरकुल योजनेचे घरे मंजूर झाले असून निवळ या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एकही घरकुल काम सुरु झाले नाही. तसेच या गावाच्या नावावरून ताडोबातील बफर सफारी गेट सुरू आहे, परंतु आजपर्यंत गावच ऑनलाईन मध्ये येत नसल्यामुळे अनेक समस्याने सुविधाने हे गाव वंचित असल्याने  शेवटी गावाकऱ्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. परंतु अजून सुद्धा गावच्या विकासाबद्दल एकही लोकप्रतिनिधी, प्रशासनाने गावाच्या विकासासाठी पुढाकार  घेतल्या नसून  वरोरा चिमुर या दोन तालुक्यांमध्ये सापडलेलं गाव आजही वंचित राहिलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!