जाहिराती चे खिळे झाडांच्या जीवावर
झाडांची आयुष्मान कमी होत असल्याने कारवाई करण्याची आवश्यकता
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - उन्हाळा सुरू झाला असून सगळीकडे उष्णतेची लाट पसरलेली आहे त्यासाठी झाडे असणे आवश्यक आहे, शेगाव तसेच वरोरा तालुक्यात ठिकठिकाणी जाहिरातीसाठी झाडावर खिळे ठोकण्यात आले असून विविध प्रकारचे जाहिराती,बॅनर लावण्याची प्रमाण वाढत आहे, याकडे प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष का बरं होत नाही असा सवाल पर्यावरण प्रेमी, नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे दिवसेंदिवस रस्त्यालगत झाडे कमी होत चालली असून सावलीचे प्रमाण सुद्धा उन्हाळ्यात नागरिकांना कमी मिळत आहे, त्यातच मोठा झाड असलेल्या झाडांवर जाहिरातीची खिळे मारून लावली जाते असून झाडांचे आयुष्य कमी होत आहे.वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून वृक्षांचे महत्व तसेच त्यांचा मानवी जीवनातील संबंध याचे वर्णन केले आहे, त्याचप्रमाणे भारतीय संविधानात माणसाच्या जगण्याबरोबर सजीव सृष्टीचे जोपासना करण्याचे कायदे सुद्धा केलेले आहे, देशात एकीकडे झाडाचे ध्वनी,वायु प्रदूषण, निसर्ग सौदरी शास्त्राच्या आवश्यक नुसार झाडांचे खूप महत्त्वाचे आहे.
एकीकडे तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकरण सिमेंट रस्ते, नाल्या, घरे, हॉटेल बांधकाम खूप सपाटीने वाढत असून त्यामध्ये मोठे मोठे झाडे कापून नामशेष झाली आहे, जिहीरातीची पोस्टर बाजी करायची झाली तर त्यासाठी मोकळी जागा सुद्धा शिल्लक राहिली नाही म्हणून झाडे दिसली तर त्याच ठिकाणी बॅनर ला खिळे लावून, तार बांधून जाहिरात लावली जात असून प्रकार वाढत आहे, पूर्वी पंधरा वर्षाच्या अगोदर सगळीकडे मोठे झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिसत असायचे सिमेंट रस्ते झाल्याने उन्हाळ्यामध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभामध्ये दुचाकी वाहनधारकांना थांबायला सुद्धा मोठे झाडे दिसत नाही कशातच शिल्लक असलेल्या काही झाडाला जाहिराती खिळे मारून मारण्याचे काम सुरू आहे फुकटचे जाहिरात प्रसारण करून झाड दिसले का वीस ते पंचवीस खिळे मारून जाहिरात लावत असतात, त्यात झाडांची वाढ थांबतो सून झाडे उदरीमुळे,किडे लागुन झाड सढायला लागतात, अशावेळी पर्यावरण प्रेमी करून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.निसर्ग सृष्टी वाचण्यासाठी सरकार लाख रुपये खर्च करत असतात आणि मानुश, पशुपक्षी,प्राणी जगण्यासाठी सजीव सृष्टीचे कायदे असून सुद्धा झाडांना वाचण्यासाठी कायदा भारतीय संविधानात आहे परंतु याचा विसर पडला आहे, झाडावर खिळे मारणे हे वृक्ष विदुपिकरण कायद्यांतर्गत येत असून खिळे ठोकणाऱ्या वर कारवाई व दंड होण्याची तरतूद भारतीय संविधानात आहे, महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे सरंक्षण, संगोपन व जतन अधिनियम 1975 कलम,8,21 नुसार या विरोधात कारवाई होऊ शकते मात्र प्रशासनाला याचा विसर पडलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!