प्रहार पक्षाचा सुंदर उपक्रम कार्यकर्त्यांचा होणार सन्मान
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित संताजी धनाजी सन्मान पुरस्कार सोहळा मंगळवारी नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यात प्रथमच राजकीय कार्यकर्त्या चा सन्मान स्वराज्य स्थापनेसाठी जीवन खर्ची घातलेल्या, इतिहास गाजवलेल्या सुभेदार संताजी ,धनाजी या महान योद्धा च्या नावाने पुरस्कार देण्यात येत आहे.ही संकल्पना बच्चुभाऊ कडू यांची आहे, पक्षाचा कार्यकर्ता समाजासाठी ,पक्षासाठी रात्रंदिवस झटत असतो अनेक समाज हिताचे आंदोलन करून, रक्तदान करून ,स्वतःचे जिव टांगणीला लावून, गुन्हे दाखल करून घेत असतो या सर्वांचा सन्मान व्हावा ही कल्पना बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने सर्व काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा म्हणून छत्रपतीच्या राज्यातील सूर सेनानी संताजी धनाजी यांच्या नावाने पुरस्कार देवून कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्ष्याचे सर्वेसर्वा माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू सोबत संताजी धनाजी सन्मान पुरस्काराचे नागपूर विभागीय निरीक्षक संजय देशमुख ,नागपूरचे जिल्हा प्रमुख रमेश कारमोरे,भंडारा अंकुश वंजारी,गोंदिया महेंद्र भांडारकर गडचिरोली निखिल धर्मीक चंद्रपूर शेरखान पठाण नागपूर शहर चे अमोल इसपांडे,तसेच दिव्यांग चे जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहे.हा सोहळा कविवर्य सुरेश भट सभागृहात मंगळवार दिनांक. २९ एप्रिल २५ ला सकाळी १०:०० वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान प्रहार पक्षा कडून करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!