महाराष्ट्रात 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

मुंबई : महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे.
समितीला 31 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्याचे विभाजन करुन घाटाखालील मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव खामगाव या सहा तालुक्यांचा समावेश खामगाव जिल्ह्यात केला जाणार आहे.

२४ टिप्पण्या:

  1. Mungantiwar is a man of fake public utterances.so one should not take his statement for granted w/r to the formation of new districts n talukas.T.O.Abraham, Yavatmal.

    उत्तर द्याहटवा
  2. होय भाऊ पुसद जिल्हा केला तर आम्हाला यवतमाळ माझ्या गावापासुन जवळपास 150 कि.मी.आहे.कामासाठी नाहक पैश्याचा भुर्दंड आमच्यासारख्या गरीब व्यक्तीवर पडतो.म्हणून पुसद जिल्हा करा.आमचा पुर्ण पाठींबा आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. होय,खरच आवश्यकता आहे अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची. सर्वसामान्य जनतेच्या विकास व उन्नतीसाठी अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होण्याची. सर्व प्रकारची जिल्हा निर्मितीची कार्यालये उपलब्ध असून भौगोलिक परिस्थितीची गरज काळानुसार आता अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे. 110-160 की.मी.ची बीडला जाण्याची ससेहोलपट आता थांबलीच पाहिजे. आता एकच मिशन जिल्हा अंबाजोगाई.
    #Zilla Ambajogai
    #We Support

    उत्तर द्याहटवा
  4. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती मागणी खूपच जूनी असून अंबाजोगाई परिसरातील सर्व गावांचा यास पाठिंबा आहे.तसेच जिल्ह्यासाठी सर्व आवश्यक कार्यालये इमारतीसह आहेत.त्यामुळे होणारा खर्च नक्कीच कमी होईल.म्हणून जिल्हा निर्मिती काळाचीच गरज आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. हैदराबाद संस्थानात अंबाजोगाई हे विभागीय प्रशासकीय ठिकाण होते.गुलबर्गा व बीदर चा कारभार येथून चाले.लष्करी छावणी होती.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बिनशर्त भाषिक पुर्नरचनेत मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यास अंबाजोगाई नामकरण झाले.थंड हवेचे ठिकाण व मांजरा,रेणा व वाण नदीच्या क्षेत्रातील संपन्न भागातील शहर बुध्दिवंताचे व परमपुज्य स्वामीरामानंदतिर्थाची कर्मभुमी आहे.शांत व सभ्य लोकांचे जन्टलमन शहर आहे.हे शहर प्रशासकीय दृष्ट्या व सुविधायुक्त आहे.जवळच भरपुर व अखंड पाणीपुरवठा करणारे हाकेच्या अंतरावर मांजरा धरण आहे.बीडपासुन 110 km अंतर आहे.शहरातून देवगाव फाटाफाटा ते विजापुर व अहमदपुर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग व घाटनांदूर ते कर्जत रोड ब्राॅडगेज मार्ग प्रस्तावित आहेत.अंबाजोगाई जिल्हा निर्मिती ही काळाची गरज आहे.अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. डोंगरी आदिवासी भागाच्या विकासासाठी सर्वाना मध्यवर्ती संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे.

      हटवा
  6. Even if it costs 350×22 crores for formation of district today but it will increase revenue of govt in future through better governance.This will also remove problem of unbalanced growth in maharashtra. Proximity to district headquarter also reduces administrative expenditure.
    So kudos to Mantri mahoday for bold step.

    उत्तर द्याहटवा
  7. राज्याला दोन मुख्यमंंत्री देणारंं पुसद.वसंंतराव नाईक प्रदिर्घ काळ मुख्यमंंत्री होते, जे अजून एकही मुख्यमंंत्री ऐवढा काळ राहीलै नाही. वसंंतराव असो वा सुधाकरराव असो तव्हा राज्याचंं कामकाज पुसद वरून चालायचंं.
    वसंंतराव नाईकांंनी तर राज्य घडवलंं. जिल्हा परिषदेची निर्मिती, धरणे,कृृषी विद्यापिठे,विद्युत निर्मिती इ. बाबी त्यांच्या काळात झालीत. प्रदिर्घ काळ मुख्यमंंत्री. जिल्हा काय विभागीय आयुक्त पाहीजे होते.
    जिल्ह्यात सोळा तालुके आहेत. उमरखेड ढाणकी पासून 170 की. मी. अंंतर. जनतेला त्रास होतोच. पुसदला सध्दा जिल्हा स्तरावरचे बरीच कार्यालये आहेत. पुसद जिल्हा झाल्यास एक देखनीय जिल्हा राज्यात तयार होइल आणि जनतेसाठी फार सोयीचे होईल.

    एक नागरीक,
    रामपूर नगर, सावरगाव गोरे ,जिल्हा पुसद.

    उत्तर द्याहटवा
  8. राज्याला दोन मुख्यमंंत्री देणारंं पुसद.वसंंतराव नाईक प्रदिर्घ काळ मुख्यमंंत्री होते, जे अजून एकही मुख्यमंंत्री ऐवढा काळ राहीलै नाही. वसंंतराव असो वा सुधाकरराव असो तव्हा राज्याचंं कामकाज पुसद वरून चालायचंं.
    वसंंतराव नाईकांंनी तर राज्य घडवलंं. जिल्हा परिषदेची निर्मिती, धरणे,कृृषी विद्यापिठे,विद्युत निर्मिती इ. बाबी त्यांच्या काळात झालीत. प्रदिर्घ काळ मुख्यमंंत्री. जिल्हा काय विभागीय आयुक्त पाहीजे होते.
    जिल्ह्यात सोळा तालुके आहेत. उमरखेड ढाणकी पासून 170 की. मी. अंंतर. जनतेला त्रास होतोच. पुसदला सध्दा जिल्हा स्तरावरचे बरीच कार्यालये आहेत. पुसद जिल्हा झाल्यास एक देखनीय जिल्हा राज्यात तयार होइल आणि जनतेसाठी फार सोयीचे होईल.

    एक नागरीक,
    रामपूर नगर, सावरगाव गोरे ,जिल्हा पुसद.

    उत्तर द्याहटवा
  9. काळी दैा हा पुसदमध्ये तालुका हवाय कारण ही मागणी फार जूनी आहे

    उत्तर द्याहटवा
  10. काळी दौलत हा तालूका होण्याबाबतच्या सर्व सुवीधा या १०००० च्या वर लोकसंख्या असलेल्या गावात उपलब्ध आहेत या साठी गावकरीच्या वतीने अनेक आंदोलने,निवेदने देण्यात आलीत पुसद जील्ह्यामध्ये काळी दौलत तालुक्याचा समावेश करने आवश्यक आहे ही आंदोलन करणारांची यशस्वीता असेल

    उत्तर द्याहटवा
  11. भाऊ भुसावळ आणि उदगीर (लातूर) ला वेगळा जिल्हा करू नका कारण हे दोन्ही सध्याच्या जिल्हया च्या ठिकाणा पासून जवळ आहेत

    उत्तर द्याहटवा
  12. पुसद जिल्ह्या ची निर्मिती ही भौगोलीक द्रुष्ट्या योग्य आहे.

    उत्तर द्याहटवा
  13. मराठवाडय़ातील व्यापारी दृष्टीकोनातून विचार केल्यास सर्वात जास्त व्यापार उदगीर येथे होतो.उदगीर हे निजामकाळापासून तालुक्याचे व महसूल जमा करण्याचे ठिकाण आहे. उदगीरची बाजार पेठ ही संपूर्ण मराठवाडय़ातील मोठी बाजार पेठ आहे शिवाय कर्नाटक व तेलंगणाच्या सिमेवर असलेले हे शहर जिल्हा झालाच पाहिजे. उदगीरवासीयांची उदगीर जिल्हा झाला पाहिजे ही खूप जुनी मागणी आहे.आपल्या शासनाने हा प्रश्न मिटवल्यास उदगीरवासीय जनता आपणास कायम विसरणार नाही.

    उत्तर द्याहटवा
  14. Udgir ha khup motha shahar aahe yamule kup taluka lewal janata udgir war jalnari aahi udgir jila kara mi aapla aabhari aani udgirchi purn janta aapla aabhar manel

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!