पट्टेदार वाघाने शिवरा येथील शेतकरी निलकंठ भुरे यांच्यावर हल्ला करून केले ठार

नागरिकांचा वनविभागावर तीव्र आक्रोश

वाघाचा बंदोबस्त दोन दिवसात केला नाही तर पुन्हा रस्ता रोको आंदोलन करणार

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा शिवरा येथील शेतकरी निलकंठ त्रेंबक भुरे वय अंदाजे ६० वर्ष दुपारी ४ ते ५ वाजता च्या सुमारास शेतामध्ये गेला असता पट्टेदार वाघाने  हल्ला चढवून शेतकऱ्यास ठार केले. शेतकरी निलकंठ भुरे हे सायंकाळी घरी परत न आल्याने नातलग व गावातील नागरीकांनी शेतामध्ये जाऊन पाहील्या नंतर ही घटना उघकीस आली.याबाबत ची माहिती वनविभागास मिळताच घटनास्थळ गाठून मृतक शेतकऱ्यांस चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शव शव विच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. या परीसरात मागील १५ दिवसात हि दुसरी घटना आहे. यामुळे नागरीकांमध्ये वन विभागाच्या विरोधात तिव्र संतापाची लाट बघावयास मिळत आहे.वाघाचा व वन्यप्राण्याचा तात्काल बंदोबस्त करण्यात यावा तसेच तात्काळ आर्थिक मदत करून परीवारातील एका सदस्याला वनविभागात नौकरी देण्यात यावी.अश्या प्रकारची मागणी नगरीका कडून केली जात  आहे. मागणी मान्य न केल्यास दोन दिवसात पुन्हा रस्ता रोको आंदोलन  करणार गावातील आजी - माजी सरपंच तथा गावकऱ्यानी दिला वनविभागाला ईशारा या ईशाऱ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेबठाकरे) पुर्ण सहकार्य असेल.

1 टिप्पणी:

  1. नागरिक मारण्याचा ठेका सरकारने वाघांना दिल्या मुळें सरकार नोकरी देणार कशी ते फक्त पैसा देऊन ठेका पुर्ण करेल.
    आंधळी प्रजा बेधुंद राजा.

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!