परिसरातील वाघांचे अस्तित्व धोक्यात, वाघाच्या शोधात फिरताहेत रात्रभर गाड्या
फिरणारी टोळी शिकारीसाठी असू शकते ? वन विभाग कारवाई करणार काय?
तालूका - प्रतिनिधी ( यश कायरकर )
नागभीड : - ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोदी (बा.) तसेच उत्तर ब्रह्मपुरी, दक्षिण ब्रह्मपुरी, सिंदेवाही, या वनपरिक्षेत्रातील परिसरामध्ये वाघांसाठी वाघांचा पाठलाग करत रात्रभर काही गाड्या फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे तसे पाहता या परिसरातील वाघांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झालेला आहे.
तळोदी - बाळापुर ते आरमोरी रोड, मेंडकी ते - एकारा -शिंदेवाही रोड, पळसगाव(जाट) ते - आलेवाही/बाळापूर रोड, ब्रह्मपुरी ते - गोवारपेठ-बाळापूर रोड, घोडाझरी गेट ते - तलाव रोड, या रोडने रात्रभर गाड्यांची वाघाच्या दर्शनाकरिता गाड्यांची रेलचेल सुरूच असते. मात्र कित्येक आंबट शौकीन रोज रात्री गाड्या घेऊन या रोडने वाघाच्या दर्शनासाठी फिरतात आणि वाघ पाहिल्यानंतर त्यांचे फोटो व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. यावर शासन कारवाई करू शकते मात्र त्याकडे विभागामार्फत दुर्लक्ष केले जाते. येथपर्यंत ठीक आहे.
मानव वन्यजीव संघर्षात वाढन्याचे प्रमुख कारण
एकीकडे मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरता व वन्यजीवांच्या रक्षणाकरिता काही 'वन्यजीव प्रेमी संघटना' जीवाचे रान करून व मोलाचे वेळ घालून रात्रंदिवस विभागाला सहकार्य करत असतात. तर दुसरीकडे काही समाजकंटकांद्वारे रात्रभर जंगलात फिरून वाघ असलेल्या ठिकाणी टॉर्च मारणे, त्याने केलेल्या शिकारी जवळ जाऊन फोटो व्हिडिओज बनवून त्याला डिस्टर्ब करणे, जंगल परिसरात रस्त्याने वाघ फिरत असताना त्याच्या समोर गाडी लावून रस्ता अडवून त्याला गावाकडे किंवा शेताकडे येण्यास भाग पाडणे, यामुळे जंगलातील रात्र शांतपणे भटकणाऱ्या वन्यजीवांना नाईलाज असतो गावात /शेतात येऊन मानव वन्यजीव संघर्षाची ठिणगी पेटण्यास अशा घटना कारणीभूत होत असून. तात्काळ या घटनांना आवर घालण्यात आले नाही तर भविष्यात फक्त वन विभागाला प्रशासनाला आणि वन्यजीवांनाच नाही तर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनाही जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्याकरिता रात्री भर वाघा मागे फिरणारे कारणीभूत ठरत आहेत.
वाघाच्या जीवाला धोका, परिसरातील काही वाघ गायब झाल्याची शक्यता नाकारता येत नाही
विभागामार्फत काही ठिकाणी दुर्लक्ष केले जाते. येथपर्यंत ठीक आहे. मात्र आता या आंबट शौकीन भुरट्यांची हिम्मत वाढून जंगलातील खोदतलाव (वाटर होल्स) , पानवठे, आणि जंगलातील ट्रॅक रोडवर मोठमोठ्याला (हाय बिम) टार्च घेऊन फिरणाऱ्यांच्या संखेत भर पडलेला आहे.
तर यातच या संधीचा फायदा घेत काही शिकारी टोळी सक्रिय होऊन रात्रभर जंगल परिसरात फिरत असल्याची गुपचूप चर्चा सुरू झालेली आहे.
यामुळे परिसरातील काही वाघ गायब ही झाले असतील ? आणि योग्य कारवाई न झाल्यास या परिसरातील कित्येक वाघ गायब होणार याबाबत दुमत नाही. यांना विभागातच काम करणारे काही मजूर/ कर्मचारी वाघाच्या (लोकेशन)अस्तित्वांची माहिती देत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे योग्य ठिकाणी पोहोचून आपले काम फत्ते करतात. काही (टोळ्या) लोकांवर संशय आल्यामुळे परिसरातील वन्यजीव प्रेमींनी यावर पाळत ठेवून पाठलाग केला असता, जंगलात वाघापासून दहा फूट अंतरावर गाडी लावून उभे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. आणि तसे फोटोज व्हिडिओ वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेले आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर कोणती योग्य कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"हे कुठेतरी थांबणे गरजेचे असून याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन जंगल परिसरात वाघांच्या किंवा वन्यजीवांच्या मागावर फिरणाऱ्या दोषींवर नक्कीच कारवाई करण्यात येणार" - लक्ष्मी शाह वन परिक्षेत्र अधिकारी, तळोधी (बा.)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!