भावपूर्ण वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न !



सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर चंद्रपूर जिल्ह्यात ०२ ठिकाणी 
भावपूर्ण वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न !
अंतिम विजय धर्माचा असल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे राहा ! 
 सनातन संस्थेचे आवाहन
 *मुल*- धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्‍यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे.; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्‍यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे श्री. दीपक जमणारे  यांनी केले.
    ते ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करत होते. यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरातील ७७ ठिकाणी आणि चंद्रपूर जिल्ह्यात ०२  ठिकाणी साजरा करण्यात आला.
श्री दीपक जमणारे म्हणाले की, भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून जी आक्रमणे होत आहेत, ती केवळ विस्तारवादासाठी नाहीत, तर हिंदु धर्माला संपवण्यासाठी होत आहेत. पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी ‘देश’ विचारून नाही, तर ‘धर्म’ विचारून गोळ्या झाडल्या. आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहासही हेच सांगतो की, जेथे जेथे धर्मांध माजले, तेथे त्यांनी हिंदूंना, हिंदूंच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले. आज आपण युद्धसदृश अवस्थेत आहोत. हे फक्त सीमांवरील लढाईसारखे वाटत असले, तरी खरे युद्ध हे धर्मयुद्धच आहे.
    प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला.
त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला.
धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
               समाजव्यवस्था टिकवून 
                                  ठेवण्यासाठी धर्म टिकणे आवश्यक आहे. धर्माचरण, धर्मपालन यांच्या शिक्षणाची आवश्यकता असून ते कुटुंबातून मिळायला हवे. आजच्या भरकटत चाललेल्या पिढीला याची नितांत गरज आहे.तसेच हिंदू धर्मावर  वारंवार आघात करणाऱ्या समस्यांवर सौ.रत्नमाला भोयर, माजी नगराध्यक्ष मुल यांनी प्रकाश टाकला.
 स्वसंरक्षण, धर्मरक्षण यामुळेच राष्ट्ररक्षण होणार असे प्रतिपादन त्यांनी केले.



ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव: देश-विदेशांतील हजारो भाविकांसाठी मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला 
१) श्री.प्रविण मोहुर्ले भाजपा मुल शहर अध्यक्ष 
२)भाजपा कार्यकर्ते 
श्री.युवराज चावरे
३)श्री प्रभाकर भोयर अध्यक्ष 
पतंजली योग समिती मुल
  मान्यवर उपस्थित होते.


आपली नम्र,

सौ. गीता कोंतमवार 
सनातन संस्था, मुल जिल्हा चंद्रपूर,
(संपर्क : ८६२३०५९१६९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!