तलाठ्यानी केली रेती तस्कराविरुद्ध एफ.आई.आर. दाखल
पण यात नेमकं कोणाला वाचविण्याचा होतोय प्रयत्न ?
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील अर्जुनी तु. येथेली काही रेती तस्करांनी पत्रकारांना धमाकाविण्याचा प्रकार घडला होता. त्याच्या बातम्या विविध वृतपत्रात व नव स्वराज्य युट्युब चॅनेल वर प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्याचीच दखल घेत अखेर त्या मुजोर रेती तस्करावर अर्जुनी येथील तलाठी यांनी वरोरा तहसीलदार यांच्या आदेशाने शेगाव पोलीस स्टेशन येथे रेती चोरीचा गुन्हा दखल केला आहे.
परंतु या सगड्यामध्ये ही घटना घडली तेव्हा प्रतक्षात तलाठी हे कुठेही हजर नव्हते. त्या वेळेला फक्त तीन पत्रकार तिथे हजर होते. मग तलाठी यांनी एफ.आई.आर. दाखल करताना पत्रकार असा उल्लेख न करता एका पत्रकारांचे निव्वळ नाव त्यामध्ये टाकण्यात आले आहे. ते तिन्ही स्वतः त्या वेळी तिथे हजर असून फक्त तो रेती तस्कर तिथून ट्रॅक्टर घेऊन फरार झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या मध्ये महसूल विभाग आपली बाजू सावरण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना? एवळ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिजची चोरी होत असताना एखादी अशी थातुरमाथुर कारवाई करीत असल्याचा आव तर आणत नाही ना? असे कित्तेक प्रश्न मात्र आता या अशा थातूरमातुर केलेल्या कारवाई मुळे निर्माण झाले आहे. तसेच महसूल विभाग खरच कारवाई करीत असेल तर मग अजूनही दिवसा ढवळ्या शेगाव परिसरात रेती इतर अवैध धंदे अजूनही कुणाच्या आशीर्वादाने सुरु तरी कसे असा प्रश्न आता जनतेच्या मनात जोर धरू लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!