अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान . पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या.. ईश्वर नरड यांची मागणी..

अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान .
 पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या..
ईश्वर नरड यांची मागणी


शेगाव बू (जगदीश पेंदाम) 

वरोरा तालुक्यातील शेगाव, चारगाव, अर्जुनी तुकुम,वायगाव, कोकेवाडा, धानोली, किनारा, दादापुर, सोनेगाव, साखरा तसेच  परिसरात इतर गावांमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून  मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने परिसरातील सर्वच नदी, नाले तलाव शेततळे भरगच्च भरून वाहू लागले आहेत. होणाऱ्या सततधार पावसाने सर्व परिसर जलमय झाला असून अनेक शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे शेतात असलेल्या सोयाबीन, कपास,तुर पिकाची मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे करिता या गावातील परिसरातील सर्व शेत पिकाची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी या परिसरातील अनेक शेतकऱ्यावर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली होती  तसेच दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले त्यात  झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे पुर येऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेतातील पिके नष्ट झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहेत आहे सोयाबीन, तुर, कापूस , या सारख्या पिकाची माती सह रोपटे  वाहून गेली आहे. तर नदी नाल्या लागत शेतकऱ्यांचे  पूर परिस्थिती मुळे नुकसान झाले आहे. तरी संबंधित विभागाने तसेच कृषी विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपा कार्यकर्ते युवा शेतकरी ईश्वर नरड यांनी केली आहे ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!