स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका दिवाळीच्या पुढे?
निवडणूका दिवाळीच्या पुढे?
राज्यात अनपेक्षित सत्तांतरण झाल्यांने, अवघ्या काही महिण्यावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलून त्या दिवाळीपर्यंत नेले जातील काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे.
नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महानगर पालिकेच्या निवडणूकाही येत्या काही दिवसात होवू घातल्या आहेत.
महाविकास आघाडीला सोयीचे होतील अशी प्रभाग रचनेचा फटका भारतीय जनता पार्टीला बसण्याची भिती आहे. 3 सदस्यीय प्रभाग रचना असावी, नगराध्यक्ष, सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून व्हावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण असावे अशी भाजपाची मागणी होती. मागील सत्तेच्या काळात हे सर्व जुळवून आल्यामुळेच राज्यात भाजपाला निर्वीवाद बहुमत मिळाले होते. महाविकास आघाडी सत्तेवर येताच, दोन सदस्यीय प्रभाग पध्दती तयार करण्यात आली. सरपंचाची थेट निवडणूक रद्द करून, सदस्यांमार्फत सरपंच/उपसरपंच निवडल्या गेले. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका झाल्यात, याचा फटका बर्यांच अंशी भाजपाला बसला तर, मराठाप्राबल्य असलेली राष्ट्रवादी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका झाल्यांने, राज्यात वरचढ झाली. ओबीसीचे राजकीय आरक्षण राहीले नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपाला निवडणूका 'जड' जातात. यामुळेच शिंदे फडणवी ससत्तेवर येताच, उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस पहिल्या बैठकीतच ओबीसी आरक्षणासाठी महत्वाचे असलेल्या इम्पेरियल डाटाचे कामाचा आढावा घेतला आणि ओबीसीचे राजकीय आरक्षण देण्याबाबत सुतोवाच केले. आता निवडणूकीला पुढे जातांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपाच्या लाभदायक स्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका दिवाळीच्या समोर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!