चिमूर तहसील चा भोंगळ कारभार

वेळेअभावीच कर्मचारी तहसील कार्यालयातून राहतात गैरहजर

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.०७/०७/२०२२ चिमूर तालुका हा नावाजलेला असून ९३ ग्राम पंचायत चा कारभार तसेच नगर परिषद चिमूर चा सुद्धा स्थायी मुख्याधिकारी नसल्याने संपूर्ण कारभार या चिमूर तहसील ला सोपविण्यात आले आहे.असे असतांना सुद्धा शासकीय कर्मचारी दुपारी ४:०० वाजताच टेबल वर नसतात हि फार मोठी शोकांतिका आहे.तसेच कर्मचाऱ्यांसाठी ६ दिवसांचा आठवडा असतांना सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:४५ असे वेळ लागू करण्यात आले होते. आता सन २०२० पासून आठवडा ५ दिवसांचा करण्यात आला.तेव्हापासून सकाळी ०९:३० ते सायंकाळी०६:१५ हे वेळापत्रक आहे.परंतु असे असतानाही जनतेला कामाविना आल्या पाऊली परत जावे लागत असते.काही कर्मचारी यांच्याशी संवाद साधला असता. एका - एका कर्मचाऱ्याला ४ टेबल सांभाळावे लागते तर काही कर्मचाऱ्यांना भिसी तहसील सुद्धा सांभाळावी लागत असून चिमूर तहसील च्या टेबलवर दैनंदिन कर्मचाऱ्यांची गैरहजेरी बघायला मिळते. याकडे तहसीलदार , उप विभागीय अधिकारी , दुर्लक्ष करीत असून जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन जनतेची संपूर्ण कामे तात्काळ होतील याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!