मुंबईतील कोस्टल रोडसाठी चंद्रपूरातील जंगलात करणार वृक्षारोपण
मुंबईतील कोस्टल रोडच्या निर्मीतीत सुमारे 9 हजार कांदळवनाची कत्तल केली जाणार असून, या पर्यावरणाचे होणारे नुकसानीच्या बदल्यात चंद्रपूरात झाडे लावली जाणार आहे.
मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा टप्पा दक्षिण मुंबईत सुरू झाला. या रोडच्या टप्यासाठी कांदळहवनातील 9 हजार झाडे तोडली जाणार आहे. त्याचे बदल्यात पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा परीसरात व्याघ्र प्रकल्पात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूरात वृक्षारोपण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.
विकासाच्या नावावर सध्याच्या घडीला समुद्रकिनारी भागात असणार्या कांदळवनाची होणारी आणि झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आल्यांने सध्या हा चर्चेचा मुद्दा झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!