शाळेत फळ वाटप व वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - वाढदिवस हा प्रत्येकांसाठी एक आनंदाचा दिवस असतो आणि तो दिवस साजरा करताना हल्लीच्या काळातील ट्रेंड प्रमाणे यथाशक्ती नुसार खर्चाची सोय करून विशेषतः युवावर्ग दारूच्या,मटणाच्या, फिरण्याच्या पार्टी चे आयोजन करताना दिसतात. तर अनेक लोक वाढदिवस साजरा करताना सामाजिकतेचा भान ठेवत दिनाचे औचित्य साधत समाजासाठी काहीतरी चांगलं करतात. त्यापैकीच एक म्हणजे यशवंत देशमुख हल्लीच्या काळात विद्यार्थी व पालक हे खाजगी शाळांकडे वळताना दिसून येतात. यामुळे शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालल्याने शाळा बंद पडण्याच्या तयारीत आलेल्या आहे. त्यापैकीच एक यशवंत यांच्या वार्डातील नेताजी शाळा अशीच मोडकळीस आलेली आहे. सोमवारी वार्डातील नेताजी प्राथमिक शाळा सध्या दयनीय अवस्थेत असून दिवसेंदिवस शाळेची पटसंख्या कमी होत चाललेली आहे. शाळेत आवश्यक सुविधांची उपलब्धता  नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ही समस्या लक्षात घेत   या शाळेला भेट देऊन या शाळेचा खालवलेला दर्जा लक्षात घेऊन शाळेला पुनर्जीवित करण्याचा संकल्प व उद्देश मनी बाळगून विदर्भ युवा क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक यशवंत देशमुख यांनी त्यांचा वाढदिवस शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये फळवाटप करून शाळेच्या प्रांगणात सावली देणारे व फळ देणारे झाड लावून साजरा करत निश्चयाला सुरुवात केली. हे उपक्रम विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक हर्षल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पार पडले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक  दौलत मसराम, शिक्षक शानू शेख,मयुरी मानापुरे, आणि वॉर्डातील प्रतिष्ठित व्यक्ती अशोक माथूरकर सर,देविका भुरे नितीन तुळसकर,विशाल तुळसकर, अनमोल नक्षिणे,आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा व आनंदाचा वातावरण कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!