जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘पोलीस मित्र’ यंत्रणा प्रभावीपणे राबवा – युवासेनेचं पोलीस अधीक्षकांना निवेदन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी "पोलीस मित्र" यंत्रणा नव्या जोमाने कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. वरोरा, चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा जिल्हाप्रमुख आलेख रमेश रट्टे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.अलीकडील काळात अंमली पदार्थांचे सेवन, मोबाईल व दुचाकी चोरी, टोळीयुद्ध, सोशल मीडियावरून भडकावणाऱ्या कृती, फसवणूक आणि दहशतीचे प्रकार जिल्ह्यात वेगाने वाढत असून सर्वसामान्य जनतेत असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा घटनांची पूर्वसूचना समाजात असते, मात्र गोपनीय माहिती पोलिसांपर्यंत वेळेवर पोहोचत नाही. या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने स्थानिक सामाजिक जाणीव असलेल्या युवकांची "पोलीस मित्र" म्हणून निवड करावी, त्यांना प्रशिक्षण द्यावं आणि विशेष संपर्क यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी सुचक मागणी निवेदनात मांडण्यात आली आहे.
पोलीस मित्रांमुळे युवकांचा सकारात्मक वापर शक्य
“पोलीस मित्र ही संकल्पना फक्त माहिती गोळा करण्यापुरती मर्यादित न ठेवता, युवकांना समाजासाठी योगदान देण्याची संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे. पोलिसांनी त्यांना योग्य प्रशिक्षण, सायबर जागरूकता, जनजागृती मोहिमांमध्ये सहभागी होण्याची संधी दिल्यास ते गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण मिळवण्यास प्रभावी ठरतील. पोलीस आणि नागरिकांमधला विश्वास दृढ करण्यासाठी पोलीस मित्र हे महत्त्वाचं ब्रीज ठरू शकतात,”
आलेख रमेश रट्टे
जिल्हा प्रमुख,युवासेना (वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!