अर्जुनी तुकुम गाव अंधारात..
अर्जुनी तुकुम गाव अंधारात..
शेगाव.(जगदीश पेंदाम)
वरोरा तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोर लगत येत असलेलं अर्जुनी तुकुम गावाची लोकसंख्या दोन हजार असून गावातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अंधारावर जीवन जगावे लागत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे....
सविस्तर असे की तीन ते चार दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे एम, एस, सी, बी ची डीपी हे नदी काठावर असून पूर्णतः पाण्यामध्ये डुबून असल्यामुळे या गावातील लाईन बंद झाली, हे गाव ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोर लगत असलेल्यामुळे गावालगत नेहमीच वन्य प्राण्यांच्या वावर असतो, ऐन पावसाच्या दिवसात एखाद्या वेळी रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी गावात आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली असुन अर्जुनी तुकुम गावाला जोडणारी नदीवरील mecb ची डीपी ही दुसरीकडे हलवून गावातील नागरिकांना सतत बंद होत असलेल्या गावातील लाईट या समस्येपासून मोकळे करावे अशी मागणी गावकऱ्यांकडून एम एस सी बी वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात येत आहे....
दोन दिवसापूर्वीच अर्जुनी लगत असलेल्या चारगाव बु. या गावांमध्ये मुसळधार पावसाने गावात वाघ आला असून चारगाव, वायगाव, अर्जुनी तुकुम हे गावे जवळ जवळ असून नदीनाले सभोवताल आहे तो वाघ अजून पर्यंत जंगलात गेला नसून शेतशिवायतच फिरत आहे, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आताही भीतीचे वातावरण निर्माण आहे अशातच ग्रामीण भागातील लाईट पावसाळ्यामध्ये वारंवार जात असून नागरिकांना रात्रीच्या मच्छर, सरपटणारे प्राणी, व ईतर हिस्त्र प्राण्यांमुळे जीवित हानी होण्याची संभावना निर्माण झाली आहे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!