पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती..
शंकरपूर (प्रतिनिधी)
वरोरा तालुक्यातील ताडोबा जंगल लगत असलेले गाव अर्जुन तुकुम येथील गावातील महिलांना भर उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या सामना करावा लागत आहे असून काही वार्ड मध्ये दोन दिवस आड वाट पाहून नळ सोडण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडून केला जात आहे तसेच वार्डनुसार भेदभाव केले जात असून सरपंचचा नळाला मुबलक पाणी येत आहे तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी संबंधित सरपंचाला फोन केले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत तरी याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची मागणी गावातील नागरिकाकडून केले जात आहे....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!