शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ थांबवा!
शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ थांबवा!
पावसाळा सुरू होताच अनेक ठिकाणी वीज तारांची स्थिती अतिशय धोकादायक बनली आहे. कुठे तारा लोंबकळतायत, तर कुठे पोल झुकलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या शेतात काम करताना दर क्षणी जीव मुठीत धरून राहत आहेत.
नागरिकांनी महावितरणला याची वारंवार कल्पना देण्यात आली आहे. तक्रारी केल्या आहेत. पण प्रशासनाचे लक्ष अजूनही या गंभीर विषयाकडे गेलेले नाही. ही केवळ दुर्लक्षाची बाब नाही, तर थेट निष्काळजीपणाची आणि जीवाशी खेळ करण्याची गोष्ट आहे.
हा मुद्दा केवळ वीज पुरवठ्याचा नाही — हा ग्रामीण भागात राहणाऱ्या सामान्य माणसाच्या जिविताचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न* आहे. एकाही शेतकऱ्याचा जीव महावितरणच्या गलथान कारभारामुळे जाऊ नये.
शहराध्यक्ष या नात्याने माझी स्पष्ट भूमिका आहे की महावितरणने तात्काळ कार्यवाही करावी, धोकादायक वीज तारा आणि झुकलेले पोल बदलावेत, अन्यथा लोकांना त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. कारण शेतकऱ्यांच्या जिवापेक्षा कोणतीही व्यवस्था मोठी नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!