गडचिरोलीच्या कल्याणासाठी देवाभाऊ प्रकट व्हा - काँग्रेसचे सेमाना देवस्थानात महायज्ञ

 

गडचिरोली - यज्ञ म्हणजे एक धार्मिक विधी जो देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि संपूर्ण विश्वकल्याणसाठी केला जातो. या विधीमध्ये अग्निमध्ये आहुती दिली जाते, मंत्र उच्चारले जातात आणि देवतांना समर्पित केले जाते. मात्र गडचिरोली काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी महायज्ञ असा अनोखा लाक्षणिक आंदोलन उभारले आहे.

      फडणवीस यांनी गडचिरोली सारख्या संवेदनशील आणि मागास जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारुन आपली प्रशंशा करून घेतली, त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांमध्येही आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र, आजवर त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधलेला नाही, आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही. यामुळे नाराज जनतेच्या भावना लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक ६ जून पासून सेमाना देवस्थान येथे 'महायज्ञ' आयोजित करण्यात आले आहे. या महायज्ञाच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा पालकमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रत्यक्ष येऊन जनतेच्या व्यथा ऐकाव्यात, ही काँग्रेस पक्षाची प्रमुख मागणी आहे.

रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरु असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होत आहे. रानटी हत्ती, वाघ, अस्वल यांच्या वाढत्या वावरामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतीवर गंभीर परिणाम झाला आहे. शेतीला २४ तास वीजपुरवठा मिळत नाही, शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही, अवकाळी पावसाच्या आणि वेळोवेळी शेतीवर येणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. सुरजागड येथील जड वाहतुकीमुळे जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यू दर वाढत आहे. जिल्ह्यात रेतीचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालू आहे सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांना वेळेत रेती उपलब्ध होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग निर्मितीच्या नावाखाली बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी केल्या जात आहेत. जिल्ह्यातील अनेक कंत्राटदारांचे देयके थकीत आहेत. रोजगार हमीतील लाभार्थ्यांचे अनुदान मिळाले नाहीत. घरकुल लाभार्थ्यांचे देयके मिळाले नाही. विहिरीचे देयके प्रलंबित आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, पावसाळ्यापूर्वी त्या रस्त्याचे काम न झाल्यास अनेक गावांचा संपर्क तुटू शकतात. आरोग्य सुविधा अपुऱ्या असून, नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे अवघड झाले आहे. युवक बेरोजगारीच्या गर्तेत असून, रोजगाराच्या संधी अपुऱ्या आहेत. जिल्ह्यातील अश्या अनेक समस्या गंभीर उग्र रूप धारण करत आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वेळोवेळी आंदोलन व निदर्शने करून सुद्धा ३ वर्षापासून पालकमंत्री म्हणून काम करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येच्या अनुषंगाने एकदाही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, त्यामुळे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने "महायज्ञ" करून राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गडचिरोली जिल्ह्यात येऊन प्रत्यक्ष जनतेला "दर्शन" द्यावा, जिल्ह्यातील शेतकरी, महिला, लघु व्यापारी युवकासह, जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधावा, आणि जिल्ह्याच्या समस्या जाणून घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात. अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. असे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगितले आहे. या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!