जनावराच्या गोठ्याला लागली भीषण आग

जवळपास चार लाखाचे नुकसान

आल्फर येथील शेतशिवारातील घटना

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
     
वरोरा : - वरोरा तालुक्यातील आल्फर येथील शेतशिवारात जनावराच्या गोठ्याला आग लागल्याने एक बैलाचा मृत्यु तसेच जनावरांचा चारा व शेतिउपयोगी अवजारे जळून खाक झाले. शेतकऱ्याचे जवळपास ४ लाखाचे नुकसान झाले असून सदर घटना २० मे २०२६ ला सकाळी १०:४५ वाजताचे दरम्यान घडली.
   आल्फर येथील पीडित शेतकरी सुखदेव मारोती गराटे वय ७५ यांच्याकडे १० एकर शेती असून त्याच शेतात जनावरांसाठी ,व शेतिउपोयोगी अवजारे ठेवण्यासाठी टीनाचा बंडा तयार केला होता. आगीची घटना घडली त्यावेळेस दोन बैल , चारा,आणि ८० स्प्रिंकल पाईप बंड्यात ठेवले होते.आगीमध्ये दोन बैलांपैकी एका बैलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.स्प्रींकल पाईप पूर्ण जळून खाक झाले आहे. गोठ्याला आग लागली हि बातमी पीडित शेतकऱ्याला शेतशिवारात असणाऱ्या लोकांनी पीडित शेतकऱ्याला दिली.तेव्हा शेतकरी शेतात गेला तर सर्व साहित्याची राखरांगोळी झाल्याचे दृश्य दिसले. वरोरा नगरपरिषद चे अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. जवळपास शेतकऱ्याचे ४ लाखाचे नुकसान झाले आहे.घटनास्थळाचा पंचनामा तलाठी यांनी केला असून त्यावेळेस गावातील पोलीस पाटील हजर होते.पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित झाले.ऐन शेती हंगामातच दिड लाखाची बैल जोडी आगीचे ठार झाले आहेत.
   शेतकऱ्याचा शेती हंगाम नुकताच सुरू होणार याचवेलेस बैलजोडी आगीने कवेत घेतली.पीक कर्जामध्ये बैलजोडी घ्यावी की शेती करावी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. प्रशासनाने पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!