पाथरीच्या उपसरपंचाचे अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच - प्रशासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष
सावली – तालुक्यातील पाथरी येथे अनेक समस्या असुन समस्याबाबत निवेदन देवूनही शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने पाथरीचे उपसरपंच तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख प्रफुल तुम्मे व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पासकंटीवार यांनी (दि. 10) पासुन माजी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग बांधव तथा महिला भगिनीच्या न्यायासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. मात्र या आंदोलनाकडे प्रशासनाने पाठ फिरवली असल्याचे दिसते.
सावली तालुक्यातील पाथरी ते सिंदेवाही रस्यालाची वाताहात झाली असुन या मार्गाने मार्गक्रम करीत असतांना जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. तर अनेक किरकोळ अपघात सुध्दा झाले आहेत, परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असुन पाथरी सिंदेवाही रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, पाथरी येथे सचिवालय असुन या ठिकाणी मंजुर असलेल्या नायब तहसिलदाराची नियुक्ती करण्यात यावी, पाथरी येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे शिक्षकांची पदे भरण्यात यावीत, प्राथमिक केंद्राची आरोग्य सेवा कोलमडली असुन रुग्णांना सावलीचे ग्रामिण रुग्णालय किंवा गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करावे लागते, परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण वाहीका नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे पाथरी येथील आरोग्य केंद्रात रुग्ण वाहीका उपलब्ध करुन देण्यात यावी, अतीक्रमणधारकांना त्वरीत पट्टे वितरीत करण्यात यावे, दिव्यांग बांधव, निराधार योजनेचे अनुदान त्वरीत वितरीत करुन दिव्यांग व निराधारांना सहारा देण्यात यावा, असोला मेंढा तलावाचे पाणी नदीला सोडल्याने अनेकांच्या शेतात पाणी साचलेले असुन शेतकऱ्यांना यावर्षीचा हंगाम करणे अडचणीचे जाणार आहे त्यामुळे तलावाचे पाणी तात्काळ बंद करावे अशा विविध मागण्या घेवून या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपसरपंच प्रफुल तुम्मे व रविंद्र पासकंटीवार यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. मात्र मंगळवारपासुन सुरु झालेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला एकाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन मागण्या समजून घेतलेले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!