किरकोळ वादातून युवकाचा खून - चार आरोपीना अटक

 

सावली : केरोडा जवळील हेटी येथील समीर हरिदास खंडारे या युवकाचा किरकोळ वादातून खून झाल्याची घटना मंगळवारी रात्रौ घडली असून घटनेत सहभागी ४ आरोपी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 

    सावली पोलीस स्टेशन अंतर्गत केरोडा हेटी येथे मंगळवारच्या रात्री ७ वाजताचे दरम्यान गावातील एका किराणा दुकानाजवळ मृतक समीर हरिदास खंडारे याचा गिरीधर वालदे व त्याचा मुलगा अभय वालदे याचेसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. परंतु अभय वालदे याच्या मनात समिरचा काटा काढायचा बेत असल्याने तो व्याहाड खुर्द येथून साईनाथ शेडमाके व पियुष लाटेलवार यांना घेऊन आला. काही कळण्याच्या आत रात्रौ ९ वाजता समीरच्या पोटावर व मांडीवर चाकूने वार करून खून केले. ही माहिती गावभर पसरताच नातेवाईकांनी सावली पोलीस स्टेशनला माहिती दिली. सावलीचे ठाणेदार प्रदीप पुल्लुरवार आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करून चारही आरोपीस अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!