नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे मूल पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे मोल पोलिसांचे आवाहन
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक बाहेरगावी जात असतात. अशा वेळी घर बंद असते. अशा परिस्थितीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत यांनी केले आहे.
बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना सांगून जाणे, किमती वस्तू ठेवण्यासाठी लाॅकरचा उपयोग करणे, घराला योग्य आणि मजबूत कुलूप लावणे, यासारख्या सावधगिरीच्या उपाय योजना करूनच बाहेरगावी प्रवास करावे असे आवाहनही ठाणेदार राजपूत यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!