निराधार लाभार्थीच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कोल्हापूरमध्ये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप

तालुका - प्रतिनिधी ( कोंडीबा काळे )

हातकणंगले : - गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. गोरगरीब निराधारच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे.असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जोपर्यंत या जनतेचे आशीर्वाद पाठबळ आणि परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी असे सामाजिक कार्य करून समाजातील शेवटच्या घटकाला शोधून न्याय द्यावा कोल्हापूर मधील कोल्हापूर विश्रामगृह कोल्हापूर प्रभाग क्रमांक. ३२/३३ येथील माजी सभापती स्थायी समिती आदील फरास यांनी अथक परिश्रम घेवून योग्य संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या  ११ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप झाले.यावेळी गोकुळ अध्यक्ष विश्वासराव पाटील (आबाजी) माजी सभापती स्थायी समिती कोल्हापूर आदील फरास, वासीम फरास,असिफ फरास,रफिक शेख,आनंदराव नरके,आलीम बारगीर व लाभार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!